आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मरा
ठी न्यूज,
मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील,
बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देव्हरे यांनी आज जिल्ह्यातील जनतेला आव्हान केले आहे कि, १ एप्रिल २०२६ पासून भारतीय जनगणना सुरु झालेली आहे. आणि उद्यापासून आपल्या जिल्ह्याची जनगणना सुरु होत आहे. दि. १ मे पासून १४ जून पर्यंत जनगणना होणार आहे त्यातील पहिला टप्पा १ मे ते १५ मे पर्यंत असून स्व जनागना होणार आहे तरी जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे कि, ज्या लोकांना मोबाईल वापरता येते अशा लोकांनी se.csnsus. gov. in या वेबसाईटवर जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक वापरून ओ टी पी ने लॉग- इन करा, तुमचे राज्य, जिल्हा आणि स्थानिक तपशील निवडा,डिजिटल नकाशावर तुमच्या घराचे स्थान चिंहांकित करा,घर आणि कुटुंबाची माहिती भरा,अर्ज सबमिट करा,अर्ज सादर केल्यानंतर तुमचा se-id मिळेल,se-id सुरक्षित ठेवा व माहितीच्या पडताळणी साठी प्रगणक भेटायला आल्यानंतर त्याला द्या.
जनगणना अतिमहत्वाची आहे सहकार्य करा.
ही जनगणना अतिमहत्वाची असून या आधारे तुमच्या समोरील सर्व शिक्षण क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात कामात अडथळा येणार नाही यासाठी काळजीने हाताळा. व ज्यांना मोबाईल हाताळता येत नाही त्यांनीही काळजी करू नये त्यांच्यासाठी १६ मे ते १४ जून पर्यंत आपल्या घरी प्रगणक माहिती घेण्यासाठी येणार आहेत त्यांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करा.प्रगणक आपल्याच कामाकरिता आपल्या घरी येत आहेत त्यांना योग्य वागणूक देऊन आपली जनगणना करून घ्या.

Post a Comment
0 Comments