नवराष्ट्र मराठी न्यूज -
मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील
• भेंडवळ भविष्यवाणी २०२६ जाहीर करण्यात आली
• यंदा मुसळधार पाऊस आणि महापुराचा इशारा • अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला • कापूस आणि तांदूळ पिकांचे उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज
देविदास वायाळ बुलढाणा -
बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळ भाकीत यंदासाठी जाहीर करण्यात आले आहे. या भाकीतानुसार शेती पिके सर्वसाधारण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, अवकाळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच देशाच्या राजकीय पातळीवर सध्याचे नेतृत्व कायम राहील, परंतु तणावपूर्ण परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
संरक्षण खात्यावर ताण वाढून सीमावर्ती भागात सुरक्षा स्थिती तणावपूर्ण राहू शकते, असा इशाराही या भाकीतातून देण्यात आला आहे. यासोबतच देशाची आर्थिक परिस्थिती काहीशी ढासळलेली राहील, असेही नमूद करण्यात आले आहे. शेती क्षेत्रात पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आली आहे.
यंदा कापूस, तांदूळ पिकाचे जास्त उत्पन्न होईल. ज्वारी, तूर, मुग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा पिकांचे सर्वसाधारण उत्पन्न होईल. तीळ, बाजरी हे पीक देखील भरपूर प्रमाणात येईल. यंदा जूनमध्ये भरपूर पाऊस असेल. जुलै सर्वसाधाण आणि ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर कमी होईल. अनेग भागांमध्ये महापुरामुळे नुकसान होईल, असा अंदाज भेंडवळ घटमांडणीतून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, भेंडवळच्या घटमांडणीची परंपरा ३७० वर्षे जुनी आहे. ही परंपरा आजही कायम आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योद्यावेळी घटमांडणीचे निरीक्षण सांगितले जाते. राज्यातील हवामान, पाऊस, राजकीय स्थिती, आर्थिक स्थिती, देशावरील संकट, महापूर, दुष्काळ यासर्व स्थितीचा अंदाज वर्तवला जातो. या भेंडवळाचा अंदाज ऐकण्यासाठी बुलडाण्यासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्यप्रदेशसह अनेक ठिकाणचे शेतकरी हजेरी लावतात.

Post a Comment
0 Comments